मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डबा ऐसपैस !!

आज एक मजाच सापडली!!! पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. ! हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy .. म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :) चला बर्‍याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :) ( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :))

माझेही दोन पैसे..

मला खरंतर अजिबात हे पोस्ट लिहायचे नव्हते. सगळे हेच लिहीत आहेत! सारेगम लिट्ल चॅम्प्स.. रिझल्ट वगैरे. पण काही गोष्टी वाचल्या आणि डोकंच आऊट झालं! कार्तिकी जिंकली यात अपेक्षाभंगाचे दुःख्ख वाटणे मी समजू शकते. प्रथमेश, आर्या खूप डिझर्विंग होते वगैरे. पण म्हणून ते नाही जिंकले, तर किती गदारोळ!? आर्या/प्रथमेश इव्हन सुरात जरा कच्चा असणारा रोहीत जिंकला तर तो बरोबर रिझल्ट! आणि ताला सुराची उत्तम जाण असलेली, रोहीत इतकीच उत्कृष्ट परफॉर्मर असलेली कार्तिकी जिंकली , की ते राजकारण, चुकीचा निकाल, झी चे अंतर्गत राजकारण, कार्तिकीच्या पालकांनी पैसे चारले, आणि या सगळ्याच्या वरताण कडी म्हणजे, ’गायकवाड’ नाव ना तिचं!!! अरे काय चाल्लंय काय?? हा? आजच्या जमान्यात, हे असे विचार कोणी करू शकत असेल हा विचार मी या जन्मातच काय पुढच्या ७ जन्मात करू शकले नसते.. मटा मधेही यावर भरभरून लेख आले. अनेक फोरम्सवर वाद पेटले आहेत! काही लोकं तर सगळा राग त्या बिचार्‍या कार्तिकीवर काढत आहेत! तिला सगळी गाणी तरी येत होती का, कस्ला तो भसाडा आणि लाऊड आवाज, अन काय काय... अरे कमॉन, तिच्याकडे टॅलंट नसतं तर ती नक्कीच इथे नसती आली! तसं व्हायला ...

एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? :D) बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा.. :)) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे! :) ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड! ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं.. :))) तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं! मला ...

"स्वच्छतेच्या बैलाला.. " च्या निमित्ताने...

तसा हा प्रचंड दुर्लक्षित विषय.. स्वच्छता, आरोग्य याच्याशी निगडीत असल्याने खरंतर भरपूर लक्ष घातलं पाहीजे.. आपल्या भारतात नसलेल्या (किंवा अती अस्वच्छ असलेल्या) स्त्रियांच्या स्वच्छतागृहांचा हा प्रश्न.. मायबोलीच्या दिवाळी अंकात अज्जुकाचा "स्वच्छतेच्या बैलाला...." हा लेख वाचला, आणि सगळं पटत गेलं.. कधी ना कधी , कुठे ना कुठे हा प्रश्न भेडसावतच असतो.. रादर, भारतात कुठेही जाताना हा प्रश्न समोर उभा ठाकतोच.. बाहेर पड्ल्यावर कुठे टॉयलेटला जावं लागू नये म्हणून कमी पाणी पिणं हा सगळ्यात सोप्पा आणि तेव्हढाच चुकीचा उपाय.. पण जवळ्पास सगळ्या मुलींनी आणि स्त्रियांनी हाच उपाय अवलांबला असेल.. सरकार किंवा ज्यांच्या अधिकारात येतात या गोष्टी ते काही करत नाहीत.. हे तर झालंच.. पण आपण काहीतरी करू शकतो ना??? आपल्या परीने प्रयत्न.. स्वच्छतेच्या बैलाला वाचून अनेक लोकांना ते पट्लं.. आणि आता ती सर्व लोकं एकत्र येऊन या अडचणीवर काहीतरी उपाय शोधत आहेत.. उदा: एखादी शॉर्ट फिल्म तयार करून ती सगळीकडे वितरीत करणे.. लोकांच्या मनावर हॅमर करणे.. संबंधित लोकांपर्यंत हे पोचवणे, लोकल वृत्तपत्रांमधून छापणे, शाळांमधून ...

आली दिवाळी!!!

आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.. इथे काय साजरी करणार? पण तरीही लोकांनी हॅलोविन साठी केलेलं लायटींग हे दिवाळीसाठीचे आहे असं समजून घेत आहे.. :) तेव्हढंच उत्सव आलाय असं वाटेल.. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे तर मज्जाच असायला पाहीजे.. पण पडलो इथे, इतक्या लांब.. मग कसली मजा.. दिवाळी कशी सगळ्या गोतावळ्यात साजरी केली पाहीजे.. आई बाबा, नातेवाईक, नातेवाईकांचे फोन.. मित्रमैत्रिणी.. दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की मी,स्नेहल,आदित्य,गजु-चिंटू असं आम्हा ५ जणांची तपासणी सूरू व्हायची.. कुठे चांगली माती आहे?? बांधकाम चालू आहे त्या बिल्डींगचे.. तिथे वीटा चांगल्या दिसतायत का कुठे? मी सगळ्यात लहान.. त्यामुळे आमचं काम लिंबू टिंबू.. उगीच आपलं मागे मागे फिरायचे.. :)) मेन काम हीच लोकं करणार.. मग माती मिळाली मनासारखी की माझं काम सुरू.. चाळणी पैदा करायची घरातून , आणि चाळत बसायचं! काय छान मातीत लोळायला मिळायचं! :P मग इकडे आमचे आर्किटेक्ट लोकं किल्ल्यांची रूपरेषा ठरवायचे.. मग हळु हळू २-३ दिवसात किल्ला साकारला जायचा.. कुणी डॉक्टर असेल तर त्यांच्या कडून इंजेक्शनची सिरींज मिळवून त्याचं कारंजं करायचे.. मावळे सा...

इडियॉक्रसी..!

असं म्हणतात माकडापासून आत्ताचा मानव विकसित झाला.. ४ पायांवरून २ पायांवर आला.. या इव्हॉल्युशन मधे शेपटीसारखे न लागणारे अवयव नष्ट झाले.. पण उद्या जर अशी वेळ आली की, मानवाने मेंदूचा, बुद्धीचा वापर करणं सोडून दिलं.. तर काय वेळ येईल?? इडियॉक्रसी बघितल्यावर समजतं काय होईल...! Joe या अत्यंत ऍव्हरेज अशा यु.एस आर्मी लायब्ररीयनला आणि Rita या प्रॉस्टीट्युटला मिलिट्रीच्या human hibernation project मधे सामिल करून घेतात.. प्रयोग असा की १वर्ष त्या दोघांना फ्रीझ करून ठेवायचं.. थोडक्यात रिसोर्सेस जपून ठेवण्याच्या दृष्टीने चाललेला हा प्रयोग..! पण होतं भलतंच.. २००५ साली फ्रीझ करून ठेवलेले ते दोघं जागे होतात २५०५ साली! ते सुद्धा ’Great Garbage Avalanche of 2505' वर..! सुमारे ५०० वर्षांत मानवामधे इतका फरक पडलेला असतो, की त्याला साध्या बेसिक गरजाही पूर्ण करता येत नाहीत. सगळ्या समाजाचा आय.क्यु. जवळजवळ ० ला जाऊन पोचलेला असतो!! सगळीकडे स्टुपिड आणि इडियट्सचा भरणा झालेला असतो.. Joe उठतो तोच मुळी कचर्‍याच्या ढीगार्‍यावरून.. पूर्णपणे डिसओरिएंटेड असल्यामुळे काय चाललंय काही कळत नाही.. कोणाशी बोलायला जावं तर सगळ...

आवडलेले काही - कवितांचा खोखो..

खूप गडबडीत असल्याने खो ला उत्तर द्यायला उशीरच झाला खरा.. संवेदने खो चालू केल्याबद्द्ल आणि राजने मला खो दिल्याबद्द्ल धन्यवाद! सगळ्यांनीच उत्तमोत्तम कवीता लिहील्या आहेत. त्यामुळे काय लिहावं हा प्रश्नच होता.. कारण मी कवीतांमधे खूप रमणारी मुलगी नाहीए. आवडत नाहीत असं नाही, परंतू कवीता समजून घेऊन वाचण्याचा पेशन्स नाहीए माझ्यात.. त्यामुळे फार कविता वाचल्याही नाहीत,ज्या वाचल्या त्या सगळ्याच लक्षात नाहीत आता... असो.. तर मी इथे १ कवीता देणार आहे माझ्या आईची.. माझी आई उत्तम कविता करते,वेळ-प्रसंगानुसार, समयोचित कवीता करणं हा आईचा हातखंडा प्रकार आहे.. या कविता जगाच्या दृष्टीने साध्याच असतील, वृत्तं,यमक,आणि अजुन काय काय सांभाळलं गेलं असेलच असं नाही. परंतू माझ्या दृष्टीने या कवीता फार मोलाच्या आहेत.. १) "सामना" ( ही कवीता, आईने ,तिचे वडील हॉस्पिटलमधे मृत्युशी झुंझत असताना लिहीली आहे.. माझे आजोबा, एक उत्तम शिक्षक होते, क्रिकेटचे प्रचंड वेड.. रणजी सामन्यांमधे आजोबांनी अंपायरींग देखील केले होते.. म्हणून ही कवीता "सामना"! इतकी आतून आली आहे ती, की ही कविता वाचताना मला हमखास माझे आजोब...