मुख्य सामग्रीवर वगळा

आवडलेले काही - कवितांचा खोखो..

खूप गडबडीत असल्याने खो ला उत्तर द्यायला उशीरच झाला खरा..
संवेदने खो चालू केल्याबद्द्ल आणि राजने मला खो दिल्याबद्द्ल धन्यवाद!

सगळ्यांनीच उत्तमोत्तम कवीता लिहील्या आहेत. त्यामुळे काय लिहावं हा प्रश्नच होता.. कारण मी कवीतांमधे खूप रमणारी मुलगी नाहीए. आवडत नाहीत असं नाही, परंतू कवीता समजून घेऊन वाचण्याचा पेशन्स नाहीए माझ्यात.. त्यामुळे फार कविता वाचल्याही नाहीत,ज्या वाचल्या त्या सगळ्याच लक्षात नाहीत आता...

असो.. तर मी इथे १ कवीता देणार आहे माझ्या आईची.. माझी आई उत्तम कविता करते,वेळ-प्रसंगानुसार, समयोचित कवीता करणं हा आईचा हातखंडा प्रकार आहे..
या कविता जगाच्या दृष्टीने साध्याच असतील, वृत्तं,यमक,आणि अजुन काय काय सांभाळलं गेलं असेलच असं नाही. परंतू माझ्या दृष्टीने या कवीता फार मोलाच्या आहेत..

१) "सामना"

( ही कवीता, आईने ,तिचे वडील हॉस्पिटलमधे मृत्युशी झुंझत असताना लिहीली आहे.. माझे आजोबा, एक उत्तम शिक्षक होते, क्रिकेटचे प्रचंड वेड.. रणजी सामन्यांमधे आजोबांनी अंपायरींग देखील केले होते.. म्हणून ही कवीता "सामना"! इतकी आतून आली आहे ती, की ही कविता वाचताना मला हमखास माझे आजोबा आठवतात, त्यांना हॉस्पिटलमधे ठेवले होते ते दिवस.. सॅड आहे, ’आवडती’ कविता नाही म्हणवत, पण तरी माझ्यासाठी मोलाची आहे म्हणून इथे लिहीते..)

आयुष्याच्या अंगणात आज एक सामना सुरू आहे
शिवाशिवीचा खेळ अगदी रंगात आला आहे
शरीर आणि आत्म्याच्या ह्या डावात,
आत्मा बाहेर येण्यासाठी तडफडतोय,
तर शरीर त्याला कोंडून ठेवण्यासाठी धडपडतेय.
आजतरी शरीराची धडपड कारणी लागली आहे,
एक सामना आज अगदी रंगात आला आहे..
कबड्डीच्या या सामन्यात -
आत्मा पार्टी सोडून प्रतिस्पर्ध्याला,
आऊट करू पाहतो आहे
पण दम गेल्यावर मात्र
स्वारी परत पार्टीत येऊन बसली आहे.
आयुष्याची दोरी अजुन बळकट आहे
आम्ही सारे प्रेक्षक शरीराच्या बाजूने,
चिअरअप, किप ईट अप म्हणत बसलो आहोत ...
टगऑफवॉरच्या या खेळात शरीराचा विजय झाला आहे..
आत्मा बिचारा गुपचुप निपचित होऊन पडला आहे..
अंपायरच्या भुमिकेत देव सतत उभा आहे..
हात वर करावा की नाही
याचा अजुन निर्णाय होत नाहीए..
कोणाच्याच अपीलला तो दाद देत नाही,
तशी पार्सलिटी त्याला मुळीच खपत नाही..!
पण असे अनिर्णीत सामने किती दिवस चालणार,
एक ना एक दिवस आत्मा मुक्त होणार..
हे सगळं माहीत असूनसुद्धा,
आसवांची तळी अजुन आटत नाहीत..
पायांची लटलट अजुन थांबत नाही,
मायेचा पाश अजुन सुटत नाही
विचारांनी सुद्धा मन थरथरू लागतंय,
मृत्युला या जगातून तडीपार करावसं वाटतंय़!!


२) ह्म्म.. दुसरी कविता संदीप खरेची.. खूप साधं ,सरळ, सोपं लिहीतो तो.. मला असंच लेखन आवडतं, गद्य व पद्यही.. त्यामुळे दुसर्‍या कवितेचा मान त्याला! तशा मला त्याच्या सगळ्याच कविता आवडतात.. एक सिलेक्ट करायची म्हणून ही..

कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी... माझ्यानंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन श्वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास तरीही-
.. परस्परांविण ना गत्यंतर

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलांस माझा
लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतुकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे 'तुझेपण'
तुझ्याबरोबर माझे 'मीपण'
तुला तोलुनी धरतो मी अन
तू ही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुस्मट होता
झरते तिकडे पाणी टपटप
अन इकडे ही शाई झरझर
...

माझा खो : किशोर आणि पिडाकाका(मनतरंग)

टिप्पण्या

Kishor म्हणाले…
Pahili kabita khup Sundar ahe. Kho mhanje nakki kay karaycha he kalla anhi pan :) mhanje mi kahitari lihun dusrya ekala kho dyaycha ka?
Raj म्हणाले…
दोन्ही कविता आवडल्या. छान चॉइस आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??