मुख्य सामग्रीवर वगळा

नेनचिम!

काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... !
खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!)

नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि नव-नविन प्रयोग चालु आहेत..पामिली तर्फे एक नविन प्रयोग अमलात आणण्यात येतो, आणि प्रचंड यशस्वी होतो! 'सिन्तारी' .. एकमेकांच्या मनातील विचार ओळखणारी यंत्रणा.. ज्यामुळे ता-वरीनी चे काम अजुनच सोपे झाले.. गुन्हेगारीला एकदम आळा घालता आला.. परंतू.. लवकरच सर्व शास्त्रद्न्यांना उमगते की नेनचिम चे या आकाशमालेतील वास्तव्य अगदीच छोटे आहे.. म्हणजे तरी काही कोटी वर्ष.. परंतू नजिकच्या काळामधे नेनचिम संपुष्टात येणार आहे याची सर्वाना जाणीव होते. आणि नेनचिम ला कसे वाचवता येईल याचा विचार चालू होतो.. आकाशमाले मधे असा कुठला ग्रह आहे का, की जिथे नेनचिम ची वस्ती हलवता येईल? परंतू असा कुठलाच ग्रह जवळ सापडत नाही. जो सापडतो.. तो कितीतरी प्रकाशवर्षे लांब असतो.. पण तरी प्रयत्न करून पाहयचे ठरते..
सर्व शाखामधले शास्त्रद्न्य कामाला लागतात.. नेनचिम वरील शास्त्र इतके पुढे गेलेले असते, की ते lab मधे मानवाचे बीज तयार करतात.. अशा पद्धतीने store करून ठेवतात की ते जेव्हा यानातून, त्या दुसर्या वस्ती होऊ शकेल अस हवामान असलेल्या ग्रहावर पोचेल तेव्हा तिथे मानवाची उत्पत्ती होऊ शकेल. परंतू या प्रयोगाच्या यशाची खात्री कोणालाच नसते.. थोडक्यात नेनचिम चा जगाच्या पाठीवर कसलंही अस्तित्व नं उरता अंत होणार अशी खात्री पटायला लागते..
तेवढ्यात, रोलान नावाचा शास्त्रद्न्य असा विचार मांडतो की.. नेनचिम हे काही फक्त मानव इकडून तिकडे गेल्याने अमर होणार नाही आहे. आपल्या ग्रहावरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्कृती.. ती जर आपण बाकीच्या जगापर्यंत पोचवू शकलो, तर नेनचिमचे महत्व नक्कीच जगासमोर येईल. इतकी प्रगत वस्ती असणारा हा ग्रह केवळ त्याच जिवनमान कमी आहे म्हणून अंत पावला हे जगाल समजेल.. हा त्याचा विचार सर्वांना पटतो.. आणि जशी एकीकडे मानवी बीज दुसरीकडे नेण्याचे प्रयत्न चालू असतात, तसेच बरोबरीने, नेनचिमचा इतिहास.. नेनचिमवरील महत्वाच्या व्यक्ती.. या ग्रहावर झालेलं संशोधन, नविन प्रयोग..आणि मुक्ख्य म्हणजे सिन्तारी... हे सर्व एका ठिकाणी store केलं जातं.. कालांतराने... नेनचिम वरील वातावरण बदलू लागते.. तापमान वाढ होते.. पाऊस कमी होतो.. हवा विरळ होऊ लागते... थोडक्यात.. वातावरण मानवास राहण्यासाठी उपयोगी राहात नाही.. खूप पुर्वी हा धोका लक्षात घेउन नेनचिम च्या गर्भामधे राहण्याची व्यवस्था पामिलीने केलेली असते.. तेथे हवा, अन्न निर्माण करायचे काम, पामिलीचाच एक शोध, 'यंत्रेश' नावाचे यंत्र करत असते.. परंतू ते प्रयत्न सुद्धा कमी पडत जातात.. सर्व मानव वंश संपतो.. एकपेशीय प्राणी काही काळ तग धरून राहतात, परंतू त्यांचाही पाडाव होतो.. राहते ते फ़क्त... नेनचिम मधील अवाढव्या प्रगत अशा इमारती.. यंत्रे... स्वयंचलीत यंत्रे! जी मानव नसताना देखील चालू राहतात.. अव्याहत त्यांना नेमून दिलेलं काम करत राहतात.. अर्थात या सोयींचा उपभोग घ्यायला कुठलाही मान्व जिवंत नसतो.. कालांतराने.. वातावरण इतके तापते.. की सर्व पोलादी इमारती.. यंत्रे वितळून जातात.. पत्त्यांच्या बंगल्यासारखे खाली कोसळतात... अर्थात आवाजही होत नाही.. कारण मुळात तिथे हवाच नसते... अशा रीतीने नेनचिमचा अंत होतो.....
पुढे आपल्याला समजते की नेनचिम म्हणजेच आपला चंद्र.. ! (अर्थात ही गोष्ट काल्पनिक आहे.. परंतू त्यांनी असे संदर्ब दिले आहेत की पुढे मानव चंद्रावर पाऊल ठेवतो.. ) तेव्हा ४ मानव पहील्यांदा चांद्रावर (इथे : नेनचिम वर) उतरतात.. तेव्हा एक स्फोट होतो.. आणि जमिनीखाली दडवलेली सिन्तारी यंत्रणेबद्दलची माहीती त्या मानवांना मिळेल अशी व्यवस्था झालेली दिसते.. त्या चार मानवांमधे.. १ अमेरीकन, १ रशियन, १ चिनी तर १ अर्थात भारतीय असतो.. भारत नावाचा! त्याला सिन्तारीच्या माध्यमातून इतर ३चे विचार कळतात.. आणि ही यंत्रणा जर पृथ्वीवर आली तर काय अराजक माजेल ते त्याला जाणवते आणि तो ती नष्ट करतो.. इत्यादी....
सगळं कथानक जरी मी इथे लिहीलं असलं तरी ते इत्थंभूत वर्णन, धारपांच्या शैलीमधे वाचण्यामधे मजा आहे!
शक्यतो कुठल्याही science fiction मधे एक सत्याचा आधार असतो.. आणि मग ती कल्पना फुलवलेली असते.. इथेही तसेच आहे.. global warming नी काय काय होऊ शकते याची चुणुक नक्कीच मिळेल.. आणि कितीही शास्त्र प्रगत झाले तरी निसर्ग, वातावरणापुढे आपले काहीही चालणार नाही याची कल्पना येते! त्यामुळे मला आधी कधीही जाणवला नव्हता इतका global warming बद्दल अवेरनेस जाणवला हे पुस्तक वाचून.. तेव्हा पुस्तक मिळालं तर जरूर वाचा....
Signature2

टिप्पण्या

Mettle म्हणाले…
i find it hard to believe that they didn't find earth for relocation from what supposed to be nenchin (moon)...
Unknown म्हणाले…
i donno. mayb mi lihinyat chukle asin. i will read the book once again, and try to answer ur query. better, u read the book! mazya hatun kahi points rahile asanyachi shakyata jast ahe..pan tujha mudda barobar ahe!
Ajit म्हणाले…
तुम्ही नारायण धारापंचं 'साठे-फायकस' वाचून पाहा.
एकदम ओरिजनल आणि भन्नाट कल्पना!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चार्ली चॅपलीन.....!

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!) २ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे.. सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ...

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि ते पण घरात! हो मी बर्‍याचदा घरीच असते, नाही नाही... मी घरकोंबडी नाहीय.. किंवा नव्हते आधी अस म्हटले तर चालेल.. आता झाले असण्याची शक्यता आहे.. कारण सद्ध्या माझे बरेचसे मित्र-मैत्रिणी पुण्यातच नाही आहेत, किंवा नोकरी निमित्त busy असतात.. तेव्हा तसं बघायला गेलं तर मला अगदी हातावर मोजण्याइतके मित्र-मैत्रिणी सद्ध्या आहेत. Orkut वर माझी frndslist जरा अतीच मोठी आहे( एकाही मुलाला/मुलीला मी ’असच’ add केलं नाहीय तरी..) पण तरीही मला ज्यांच्याबरोबर माझं पटतं अशी लोकंच कमी आहेत. neways नमनाला घडाभर काय, विहीरीभर तेल झाले! तर सांगायचा मुद्दा असा, की मी बर्‍याचदा घरीच असते.. हो अगदी २४ तास सुद्धा... तेव्हा असा प्रश्न उमटणे अगदी साहजिक आहे! खुप वेळा माझ उत्तर असते, मी वाचते.. लोकं माझ्याकडे zoo मधल्या प्...

Rave party & TOI ...

आज हे वाचले.. TOI ची प्रचंड चीड आली.. Rave party करणा‍र्‍या लोकांची बाजू मांडतायत Editor साहेब.. म्हणे होळी मधे सगळीकडेच सेलीब्रेशनचा मूड असतो, उत्तर भारतात सगळ्यांनाच अटक करावी लागेल n blah blah... ok, पार्टी अरेंज करणे, दारू, डान्स असणे (म्हणे) आता कॉमन झालय.. पण सिंहगड पायथा ही जागा नव्हे ना.. आणि नुसती पार्टी तरी ठीके.. त्या पार्टी मधे मारिजुआना(असच असतं ना काहीतरी??) वगैरे ड्रग्स सापडली आणि TOI सारखी प्रसारमाध्यमं असे editorials लिहीतात... काय बोलायचं आता !! अर्थात TOI कडून हेच अपेक्षीत आहे. त्यांचा Pune Times वाचायला घेतला की वाटते, पुण्यामधे पार्ट्या, डिस्क्स या शिवाय काहीच नाही आहे, आणि इतर कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम होतच नाहीत.. त्या मानाने सकाळ खूपच चांगला.. Today ब‍र्यापैकी वाचनीय असतो.. तसेच ही न्युज बरीच चांगली कव्हर केली सकाळनी.... केवळ rave parties विरुद्ध लिहीले म्हणून नाही म्हणत मी.. पण बराच निःपक्षपाती आहे त्यांची अजूनही पत्रकारीता.. तुम्हाला काय वाटते??